Home|
About ENVIS|
Our Team |
E-Pledge |
Events
|
li>
Expert List |
li>
Covid-19 |
li>
Calendar 2024 |
li>
Green Jobs
li>
News Articles in Regional Langauge (मराठी)
^ जानेवारी - मार्च, २०२२
०७ फेब्रुवारी २०२२ | संदर्भ: महाराष्ट्र टाइम्स
वाढते प्रदूषण आणि व्हायरसच्या प्रकोपापासून सुरक्षित राहण्यासाठी वापरून बघा हे face masks, कमी किमतीत मिळवा उत्तम सुरक्षा
आजकाल कोरोना व्हायरस, प्रदूषण आणि बॅक्टेरियाचा धोका सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे. अश्या परिस्थितीत आपण सुरक्षित राहण्यासाठी फेस मास्कचा...
२५ जानेवारी २०२२ | संदर्भ: महाराष्ट्र टाइम्स
दमा, श्वास घेण्यातील त्रास वाढला
बोचरी थंडी, धुळीचे वादळ, वाढलेल्या प्रदूषणामुळे श्वसनविकार तसेच दम्यासारखा आजार असलेल्या रुग्णांना पुन्हा त्रास होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.
१९ जानेवारी २०२२ | संदर्भ: महाराष्ट्र टाइम्स
तापमान घटल्याने वायू प्रदूषणात वाढ
शहरात आठवडाभरात घटलेले तापमान आणि शहराच्या चहूबाजूंनी सुरू असलेल्या बांधकामामुळे, वाहनांच्या वर्दळीमुळे वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. शहरातील हवेची गुणवत्ता 'समाधानाकारक' श्रेणीतून 'वाईट'वर पोहोचली आहे.
१० जानेवारी २०२२ | संदर्भ: लोकमत
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर प्रदूषित हवेने १४ दिवसांत फुप्फुस काळे; 'लंग इंस्टॉलेशन’ हा नवा उपक्रम
२७ डिसेंबर २०२१ रोजी जंगली महाराज रस्त्यावर ‘लंग इंस्टालेशन’ करण्यात आले असून हा उपक्रम क्लिन एअर पुणे अंतर्गत पुणे पालिका व परिसर या संस्थेकडून राबविला जात आहे
०७ जानेवारी २०२२ | संदर्भ: लोकमत
तुम्ही टाकलेल्या जुन्या टायरचे काय होते? पर्यावरण वाचविण्यासाठी एक मदत कराल?....
जुने टायर तुम्ही घराच्या शेजारी, आंदोलनांमध्ये जाळण्यासाठी, मोठमोठ्या झाडांची खोडे जाळण्यासाठी वापरताना पाहिले असतील...
^ ऑक्टोबर - डिसेंबर, २०२१
२९ नोव्हेंबर २०२१ | संदर्भ: लोकमत
'ही' आहेत देशातील टॉप-10 प्रदूषिक शहरे, दिल्लीतील हवेची गुणवत्ता सर्वात खराब
राजधानी दिल्लीत सर्व प्रयत्न करूनही प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी झाले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व उपाययोजना करुनही दिल्ली देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये../font>
१५ नोव्हेंबर २०२१ | संदर्भ: सकाळ
बंद करता येऊ शकणाऱ्या उद्योगांची यादी काढा: सुप्रीम कोर्ट
राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये सध्या वायू प्रदूषणाची भयानक परिस्थिती आहे. याबाबत आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरु आहे. आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकार
१३ नोव्हेंबर २०२१ | संदर्भ: लोकमत
दिल्लीत लॉकडाऊन! प्रदूषणामुळे लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला
दिल्लीमध्ये जे प्रदूषण होते ते पंजाब, हरियाणासारख्या आजुबाजुच्या राज्यांमध्ये शेतात आग लावल्याने किंवा फटाके फोडल्यामुळे होते असे नेहमी सांगितले जाते. दिवाळीमध्ये दिल्लीवासियांनी फटाके मोठ्या प्रमाणावर फोडले आहेत.
०९ नोव्हेंबर २०२१ | संदर्भ: लोकमत
वायुप्रदुषणामुळे 'या' जीवघेण्या आजारांचे कायमस्वरुपी रुग्ण व्हाल, त्वरित करा हे घरगुती उपाय
वाढत्या प्रदूषणापासून सुरक्षित राहण्यासाठी आपण घरगुती उपाय करून पाहू शकता. हे फुफ्फुस स्वच्छ करतील, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल आणि तुमचे शरीर डिटॉक्स करेल.
०७ नोव्हेंबर २०२१ | संदर्भ: लोकमत
आतषबाजीमुळे दिल्लीत हवेची गुणवत्ता खालावली; शेतकऱ्यांचेही महामार्गावर आंदाेलन सुरूच
सर्वाेच्च न्यायालयाने यावर्षी फटाकेबंदीबाबत अतिशय कठाेर निर्देश दिले हाेते. मात्र, न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून देशभरात माेठ्या प्रमाणावर फटाके फाेडण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता अतिशय धाेकादायक पातळीवर आली आहे../font>
०४ नोव्हेंबर २०२१ | संदर्भ: सकाळ
जगभरातील हवामान बदलाने कृषी व्यवस्था धोक्यात
जगभरातील विविध प्रदेशांत व प्रामुख्याने अन्नधान्य उत्पादक देशांत हवामान बदलाचे परिणाम दिसू लागले आहेत. हे बदल असेच कायम सुरू राहिल्यास येत्या दशकामध्ये जागतिक कृषी व्यवस्थेवर...
३१ ऑक्टोबर २०२१ | संदर्भ: लोकमत
हवामान बदल ही एक जागतिक महामारीच; संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या माजी संचालक राजेंद्र शेंडे यांचे मत
हवामान बदल परिषदेपुढील उद्दिष्टे काय आहेत? जागतिक हवामान बदल व तापमानवाढीमुळे पूर, दुष्काळ, वणवे, हिमनद्या व हिमनग वितळणे, अशी अनेक संकटे उभी राहत आहेत. तापमानवाढ ही कार्बन उत्सर्जनामुळे होत आहे.
^ जुलै - सप्टेंबर, २०२१
२९ सप्टेंबर २०२१ | संदर्भ: लोकमत
हवामान बदल शेतीसाठी मोठे आव्हान - मोदी
प्रतिकूल हवामानाशी जुळवून घेत त्याला प्रतिसाद देणाऱ्या ३५ पीक जातींचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उद्घाटन केले.
२४ सप्टेंबर २०२१ | संदर्भ: लोकमत
हवामानातील बदल भ्रष्ट जीवनशैलीचा परिपाक
हवामानातील बदल ही केवळ नैसर्गिक प्रक्रिया नसून तो आपल्या भ्रष्ट जीवनशैलीचा परिपाक आहे. त्यामुळे हवामान बदल ही ...
२३ सप्टेंबर २०२१ | संदर्भ: लोकमत
हवामान बदलांची दिशा ओळखून वेळीच सावध होणे गरजेचे
हवामान बदलांचा सर्वाधिक परिणाम बर्फाळ प्रदेशावर होतो. बर्फ वितळून उद्भवणाऱ्या आपत्तीला येत्या ३० ते ५० वर्षांत आपल्याला ...
२२ सप्टेंबर २०२१ | संदर्भ: लोकमत
एअर क्वालिटी इंडेक्सची मानके बदलली, जाणून घ्या कोणत्या देशांवर होणार सर्वाधिक परिणाम
जागतिक आरोग्य संघटनेनं ग्लोबल एक्यूआय इंडेक्सच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केले आहेत. जागतिक संस्थेने आता सार्वजनिक आरोग्य लक्षात घेऊन
२२ सप्टेंबर २०२१ | संदर्भ: लोकमत
मुंबईत हवेची गुणवत्ता मांडणाऱ्या भारतीय बनावटीच्या सफर मॉडेलला जागतिक स्तरावर मान्यता
केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाने नागरिक, निर्णयकर्ते आणि संशोधकांसाठी तयार केलेली सफरची हवा गुणवत्ता पूर्वानुमान यंत्रणा सध्या चार शहरांत कार्यरत आहे.
०६ सप्टेंबर २०२१ | संदर्भ: लोकमत
वातावरणातील बदलाला अनुसरून शेती करणे काळाची गरज
वातावरणातील बदलामुळे मानवी जीवनावर तसेच शेतीवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. त्यामुळे ...
०१ सप्टेंबर २०२१ | संदर्भ: लोकमत
...तर 'त्या' भारतीयांचं आयुष्य ९ वर्षांनी घटणार; महाराष्ट्रासाठी परिस्थिती आणखी चिंताजनक
जगातील वायू प्रदूषणाचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. याचा थेट परिणाम पर्यावरण आणि माणसाच्या आरोग्यावर होत आहे. वायू प्रदूषणामुळे भारतीयांचं आयुष्य कमी होण्याची भीती
१३ ऑगस्ट २०२१ | संदर्भ: #
जगबुडीच्या आधी ‘भारतबुडी’चा असेल धोका; आयपीसीसीचा इशारा
गेल्या महिन्यात कोकण किनारपट्टी व पश्चिम महाराष्ट्राला बसलेला अतिवृष्टी व महापुराचा तडाखा, दरडी कोसळण्याच्या वाढत्या घटना, दोन वर्षांपूर्वी केरळमधील हाहाकार, हिमालयातील आस्मानी संकटे हे निसर्गचक्र बिघडल्याचे लक्षणे आहेत.
२४ जुलै २०२१ | संदर्भ: लोकमत
वातावरणाच्या बदलाने पाऊसही बदलला, भविष्यात अशा घटना वाढणार
उत्तरेकडून येणारे वारे आणि अरबी समुद्रामधून दक्षिण आणि पश्चिम दिशेने येणारे वारे यांचा..
१४ जुलै २०२१ | संदर्भ: लोकमत
वातावरण बदलांमुळे आजारांची भीती
प्रखर दिव्यांमुळे अपघाताची शक्यता गोंदिया : दुचाकी व चारचाकी वाहनांच्या प्रखर दिव्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. काही वाहनचालक साधे...
१३ जुलै २०२१ | संदर्भ: लोकमत
2030 मध्ये चंद्र आपली जागा बदलणार, पृथ्वीवर येणार मोठं संकट - NASA
चंद्रामुळे निर्माण होणाऱ्या पूर स्थितीला अध्ययनात 'विनाशकारी पूर' म्हणण्यात आले आहे. अशा प्रकारचे पूर किनारपट्टी भागात येतात...
०२ जुलै २०२१ | संदर्भ: लोकमत
वातावरण बदलाविरुद्धचा लढा आणखी बळकट होणार
देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित महाराष्ट्रावर वातावरणीय बदलाचा, नैसर्गिक आपत्तींचा परिणाम कमी व्हावा यासाठी राज्य ...
०१ जुलै २०२१ | संदर्भ: लोकमत
जांभूळ फळाला वातावरण बदलाचा फटका
ग्रामीण भागात आरोग्यदायी असणाऱ्या जांभूळ फळाला चांगली मागणी आहे. यंदा या फळाला वातावरण बदलाचा ...
^ एप्रिल - जून, २०२१
०५ जून २०२१ | संदर्भ: लोकमत
जागतिक हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज- पंतप्रधान नरेंद्र मोदी
गेल्या सहा ते सात वर्षांमध्ये भारताची रिन्यूएबल एनर्जीची क्षमता ही २५० पटींहून अधिक झाल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितलं...
२१ मे २०२१ | संदर्भ: लोकमत
राजाराम तलावातील मासे हवामानातील बदलामुळे मृत
हवामानातील अचानक बदल आणि गढूळ पाणी मोठ्या प्रमाणात मिसळल्याने येथील राजाराम तलावातील पाण्यामधील ऑक्सिजनची पातळी खालावल्याने...
२० मे २०२१ | संदर्भ: लोकमत
हवामान बदलाला अनुरूप जलद संशोधनाची गरज
सातत्याने होणा-या हवामान बदलाचा पीक उत्पन्नावर परिणाम होत आहे. तेव्हा हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जलद गतीने कृषी संशोधन ...
०९ मे २०२१ | संदर्भ: लोकमत
दररोज दुपारनंतर वातावरणात बदल
शहर व तालुक्यात गत आठ दिवसांपासून दुपारनंतर वातावरणात बदल होत आहे. दुपारी चारनंतर आकाशात ढग जमा होऊन ...
२७ एप्रिल २०२१ | संदर्भ: लोकमत
वणी परिसरात हवामानात बदल
परिसरात सायंकाळच्या सुमारास वादळी वारा व विजेचा कडकडाट अशा वातावरणात हलकासा पाऊस झाला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमान कमालीचे वाढले आहे.
०८ एप्रिल २०२१ | संदर्भ: लोकमत
महाराष्ट्रात दरवर्षी १.८ लाख लाेक प्रदूषित हवेचे बळी
जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात हवा प्रदूषणाने दरवर्षी जवळपास ७० लाख लोक मरण पावतात. लॅन्सेट हेल्थ जर्नलच्या रिपोर्टनुसार महाराष्ट्रातही दरवर्षी १.८० लाख लाेक प्रदूषित हवेचे बळी ठरत आहेत.
^ जानेवारी - मार्च, २०२१
२६ जानेवारी २०२१ | संदर्भ: लोकमत
चिंताजनक! संशोधनातून समोर आलं Miscarriage होण्यामागचं मोठं कारण, तज्ज्ञांचा दावा
वायू प्रदूषणामुळे जसा फुफ्फुसांवर प्रतिकुल परिणाम होतो त्याचप्रमाणे गर्भावरही याचा प्रतिकुल परिणाम होतो...
२५ जानेवारी २०२१ | संदर्भ: लोकमत
आठ वर्षांहून अधिक जुन्या वाहनांवर लागणार ग्रीन टॅक्स, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
केंद्रीय रस्ते वाहतून आणि महामार्ग मंत्रालयाने आठ वर्षे जुन्या वाहनांवर कर आकारण्याची तयारी सुरू केली आहे.
२५ जानेवारी २०२१ | संदर्भ: लोकमत
हवामान बदलाचा होतोय ऋतूंच्या कालावधीवर परिणाम
मेहा शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरातील हवामानाच्या वेळापत्रकात मागील काही वर्षांपासून चिंताजनक बदल घडत आहेत. तज्ज्ञांच्या मते, ...
१५ जानेवारी २०२१ | संदर्भ: लोकमत
वातावरण बदलामुळे अनेकांच्या आरोग्यात बिघाड
नाल्यांवर ढापा बसविण्याची मागणी नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव गावातील काही नाल्यांवर ढापा नसल्याचे दिसत आहे. ...
१० जानेवारी २०२१ | संदर्भ: लोकमत
माझगाव, बीकेसी, बाेरीवलीला सर्वाधिक प्रदूषणाचा पडला विळखा
गेल्या आठ दिवसांपासून मुंबईसह आसपासच्या परिसरातील वातावरण प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. धूर, धूळ आणि धुके यांच्या मिश्रणाने...
०६ जानेवारी २०२१ | संदर्भ: लोकमत
ॲप वापरून कमी करा कार्बन उत्सर्जन
आपण दररोज विनाकारण कार्बन तयार करतो आणि तो हवेत जाऊन प्रदूषणात भर घालतो. पण आता आपण आपलं कार्बन कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो...
^ ऑक्टोबर - डिसेंबर, २०२०
३१ डिसेंबर २०२० | संदर्भ: लोकमत
सोलापूरकरांना त्रासदायक ठरणाऱ्या अतिसूक्ष्म धुलीकणावर संशोधन करणार
शहरात दोन ठिकाणी प्रदूषण मापक यंत्रणा : एमपीसीबी, ऑर्किड कॉलजेचा पुढाकार ...
२९ डिसेंबर २०२० | संदर्भ: लोकमत
पुण्यातील तरुणीची जबरदस्त कामगिरी; कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे मोबाईल ॲप केले विकसित
प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावशाली पाऊल...
२५ डिसेंबर २०२० | संदर्भ: लोकमत
Air on Sale! आता पाण्या प्रमाणेच विकलीजातेय बाटलीबंद 'हवा'!, किंमत वाचून व्हाल अवाक
विशेष म्हणजे, कंपनीने दावा केला आहे, की या बाटलीबंद हवेचा सुगंध घेऊन लोक काही वेळातच शेकडो मैल दूर आपल्या घरी पोहोचू शकतील...
०२ नोव्हेंबर २०२०| संदर्भ: लोकमत
हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात शेतामध्ये लावलेल्या आगींमुळे नवी दिल्लीत प्रदूषण वाढले
दिल्ली नजीकच्या काही राज्यांमध्ये शुक्रवारी शेतात लावण्यात आलेल्या आगींचे प्रमाण याप्रमाणे होते. पंजाबमध्ये अंदाजे ४,२६६, हरयाणामध्ये १५५, उत्तर प्रदेशमध्ये ५१, मध्यप्रदेशात ३८१ ठिकाणी शेतात आगी लावण्यात आल्या...
०१ नोव्हेंबर २०२० | संदर्भ: महाराष्ट्र टाइम्स
फटाक्यांची लवकरच आवाज तपासणी
प्रत्येक दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता आवाक्यात ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दरवर्षी होणाऱ्या मापनासंदर्भात अद्याप आदेश निर्गमित झालेले नाहीत..
३१ ऑक्टोबर २०२० | संदर्भ: लोकमत
दिवाळीत फटाके फोडू नका; कारण फटाक्यांच्या धूराचा त्रास कोरोना रुग्णांना होईल
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर अद्यापही कोरोनातून बरे झालेले नाही. रुग्णांची संख्या कमी होत असली तरी देखील नियमांचे उल्लंघन झाल्यास कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. आणि आता त्यात दिवाळी तोंडावर आली आहे
३० ऑक्टोबर २०२० | संदर्भ: लोकमत
नवी मुंबईत वायुप्रदूषण चिंताजनक, श्वसनाच्या वाढत्या तक्रारी
नवी मुंबई : कोरोनाच्या संसर्गामुळे अगोदरच मेटाकुटीला आलेल्या नवी मुंबईकरांना मागील काही दिवसांपासून वायुप्रदूषणाचा प्रश्न भेडसावत आहे..
२९ ऑक्टोबर २०२० | संदर्भ: लोकमत
पश्चिम द्रुतगती मार्गाने प्रदूषणात नाव काढले, प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य खालावले
सध्या पश्चिम द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त गाड्यांच्या वर्दळीचा मार्ग असून १० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी ३ ते ४ तासाचा अवधी लागत आहे...
२६ ऑक्टोबर २०२० | संदर्भ: महाराष्ट्र टाइम्स
वाहनांचा धूर टाकतोय प्रदूषणात भर
पुढे सरकणारे अनलॉकचे टप्पे आणि जनजीवन पूर्ववत होताना रस्त्यांवरील वाहनांच्या संख्येत झालेली वाढ आणि शहरातील सर्वच भागातील वाढती रहदारी हवेच्या प्रदूषण पातळीत वाढ करणारी ठरू लागली आहे...
२६ ऑक्टोबर २०२० | संदर्भ: लोकमत
धूळ, प्रदूषणामुळे येणारा खोकला की कोरोनाचं संक्रमण? असा ओळखा या दोघांमधील फरक
घसा खवखवणे आणि कोरडे खोकला ही कोरोनाची विषाणूची लक्षणं आहेत, परंतु बाह्य वातावरणामुळे देखील दम लागणं घसा खवखवणं, श्वास घ्यायला त्रास होणं अशा समस्या उद्भवतात...
२६ ऑक्टोबर २०२० | संदर्भ: लोकमत
कोरोनातून बरे होणाऱ्यांना विषारी, प्रदूषित हवेचा धोका जास्त; या आजाराची लस घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून रिकव्हर झाल्यानंतरही रुग्णांना समस्यांचा सामना करावा लागतो. कोरोनातून बाहेर...
२३ ऑक्टोबर २०२० | संदर्भ: लोकमत
"भारत विषारी हवा सोडणारा देश", डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकास्त्र
ट्रम्प यांनी अध्यक्षीय वादविवादात पर्यावरण बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या मुद्यावर आपल्या धोरणांचा बचाव करण्यासाठी भारत, चीन आणि रशियावर निशाणा साधला...
१९ ऑक्टोबर २०२० | संदर्भ: लोकमत
मोदी सरकारच्या निर्णयांमुळे प्रदूषणाला लगाम - जावडेकर
जावडेकर म्हणाले की, प्रदूषण रोखण्यासाठी जे निर्णय घेतले त्याचे सकारात्मक परिणाम स्पष्ट दिसत आहेत. २०१४ पर्यंत...
१५ ऑक्टोबर २०२० | संदर्भ: लोकमत
औरंगाबादमधील प्रदूषणाचा वाढता इंडेक्स उद्योगांच्या मुळावर
औरंगाबाद : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाच वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार औरंगाबाद शहरातील प्रदूषण पातळी...
१४ ऑक्टोबर २०२० | संदर्भ: लोकमत
रेड झोनची चाहूल: दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वत्र प्रदूषण; वायू गुणवत्ता निर्देशांक ‘रोगट’
नवी दिल्ली : आठवडापूर्वी-दिल्ली एनसीआरमध्ये असलेली स्वच्छ हवा आता नाहीशी झाली आहे. दिल्लीत आज कॅनॉटप्लेस आणि गाझिपूर हा भाग...
१२ ऑक्टोबर २०२० | संदर्भ: महाराष्ट्र टाइम्स
प्रदूषण मोजणी होणार सॅटेलाइटद्वारे?
वाढत्या वायुप्रदूषणाची समस्या भारतासह संपूर्ण जगाला भेडसावत आहे. मात्र हवेतील प्रदूषणकारी घटक नेमके लक्षात येण्यासाठी आणि त्या माध्यमातून यावर नियंत्रण...
१२ ऑक्टोबर २०२० | संदर्भ: लोकमत
गाडीला बीएस-६ मानक, तर पीयूसीची गरज कशाला? केंद्र शासनाने निर्णय घ्यावा
वाहनांमध्ये पर्यावरण अनुकूल इंजिन बसविण्यात आले आहे. असे असतानादेखील या वाहनांसाठी पर्यावरण नियंत्रण प्रमाणपत्रांची (पीयूसी) सक्ती का? असा सवाल उभा राहिला आहे...
०१ ऑक्टोबर २०२० | संदर्भ: लोकमत
पिंपळ, तुळस, कडुलिंब रात्रीही सोडतात ऑक्सिजन
पिंपळच नाही तर असे अनेक वृक्ष आहेत जे रात्रीसुद्धा प्राणवायू बाहेर सोडतात किंवा त्यांच्यामध्ये ऑक्सिजन सोडण्याची क्षमता अधिक असते...
^ जुलै - सप्टेंबर, २०२०
३० सप्टेंबर २०२० | संदर्भ: लोकमत
रस्ता प्रदूषणाला वाहनचालकांचा विरोध
घुग्घुस : वेकोलिच्या पैनगंगा ते घुग्घुस रेल्वे सायडिंगपर्यत कोळसा वाहतूक करणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले व रात्रंदिवस चालत असलेल्या...
२३ सप्टेंबर २०२० | संदर्भ: लोकमत
ऑक्सिजन वाढविण्यासाठी वनविभागाने जगविली सव्वातीन लाख झाडे
सोलापूर : कोरोना काळात नैसर्गिक आणि कृत्रिम ऑक्सिजनची चर्चा घराघरात होतेय़ याचे महत्त्वही प्रत्येकाला कळून आले आहे. सोलापुरात नैसर्गिक ऑक्सिजन...
१४ सप्टेंबर २०२० | संदर्भ: लोकमत
कोरोनाच्या काळात कमी प्रदूषणामुळे श्वसन आरोग्यात सुधारणा, ओझोनच्या प्रमाणात १७ टक्के वाढ
भारतातील घातक घटकांच्या उत्सर्जनाची पातळी लक्षणीय प्रमाणात कमी झाली. साहजिकच हवेचा दर्जा व एकूणच लोकांच्या श्वसनाचे आरोग्य सुधारले...
१३ सप्टेंबर २०२० | संदर्भ: लोकमत
प्रदूषणामुळे कोरोनासह ग्लोबल वॉर्मिंगचेही चटके, अहवालातील निष्कर्ष
लॉकडाऊनमुळे कार्बन उत्सर्जन ४ ते ७ टक्के घटल्याचा अंदाज आहे. विशेषत: एप्रिल २०२० मध्ये लॉकडाऊनचा पहिला टप्पा सुरू होता तेव्हा गतवर्षीच्या तुलनेत उत्सर्जन १७ टक्के घटले होते....
०८ सप्टेंबर २०२० | संदर्भ: सकाळ
स्वच्छ हवेसाठी संयुक्त राष्ट्रे आग्रही; ‘निळ्याशार आकाशासाठी स्वच्छ हवा’ दिन साजरा
हवाप्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी आणि त्याविरोधात कृती करण्यासाठी जगभरात आज प्रथमच जागतिक ‘निळ्याशार आकाशासाठी स्वच्छ हवा’ दिन साजरा केला गेला.
२८ ऑगस्ट २०२० | संदर्भ: लोकमत
वेकोलि खाणीमुळे माजरी प्रदूषणाच्या विळख्यात
वेकोलिच्या खुल्या खाणीत उत्पादन झालेल्या कोळशाचे मोठे दगड क्रेशर मशीनद्वारे बारिक करीत असताना मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. परिसरात वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने माजरीकरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. दरम्यान, पीडित नगरिकांनी आमचे पुनर्वसन करा. अन्यथा वेकोलि प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण करू, असा इशारा दिला आहे..
२६ ऑगस्ट २०२० | संदर्भ: सकाळ
वणव्यांच्या वसुंधरेला झळा
धुरातील काळा आणि करडा रंग उष्णता शोषून घेतो व त्यामुळे खालील भागाचे तापमान वाढते.. त्यामुळे भविष्यात जागतिक तापमानवाढीची समस्या अधिक गंभीर बनेल, असा इशारा ‘नासा’ने दिला आहे...
२३ ऑगस्ट २०२० | संदर्भ: लोकमत
३० टक्क्यांनी शहरांचे प्रदूषण कमी करणार; एमपीसीबीच्या कार्यशाळेचे उद्घाटन
औरंगाबाद : राज्यातील प्रदूषण कमी करण्यासह पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध उपाययोजना आखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि दिल्ली आयआयटी माजी विद्यार्थी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच आॅनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. यात २०२४ पर्यंत राज्यातील प्रमुख शहरांतील प्रदूषण ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात...
१९ ऑगस्ट २०२० | संदर्भ: लोकमत
प्रदूषण आणि प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर प्रश्न सुटला पाहिजे
माहुल येथे स्थित १० पेक्षा जास्त घातक रासायनिक कंपन्या आणि ३ मोठ्या रिफायनरी यातून होणाऱ्या प्रदूषणामुळे रहिवाशांच्या आरोग्यावर होणारे परिणाम आणि बरेच मृत्यू हे सर्व सत्य मांडण्यात आले आहे.
१३ ऑगस्ट २०२० | संदर्भ: लोकमत
सावधान! PUC नसल्यास 10000 चा दंड; दिल्लीमध्ये नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात
नवी दिल्ली : गेल्या वर्षी रस्ते वाहतूक मंत्रालयाने वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी नियम अधिक कठोर केले होते. आधीचे दंड 10 पटींनी वाढवत तुरुंगवासासारख्या शिक्षेचीही तरतूद केली होती. यामध्ये वाहनाची पीयुसी नसल्यास तब्बल 10000 रुपयांचा दंड आकारला जाणार होता. याच नियमाची अंमलबजावणी दिल्ली आरटीओने सुरु केली असून आता हळूहळू देशभरातही हे नियम लागू होण्य़ाची शक्यता आहे.
१० ऑगस्ट २०२० | संदर्भ: लोकमत
दररोज दीड हजार किलो ‘कोविड बायो वेस्ट’
नाशिक शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने ‘कोविड बायो वेस्ट’चे प्रमाणदेखील वाढू लागले आहे. दररोज दीड हजार किलो इतका कचरा कोविडच्या सरकारी व खासगी रुग्णालयांमधून संकलित करत त्याची योग्य त्यापद्धतीने खबरदारी घेत विल्हेवाट लावली जात आहे. एकूणच कोरोनाच्या संक्रमणामुळे आता रुग्णालयातील वैद्यकीय सेवा आणि सर्वच बाबींवर ताण...
०७ ऑगस्ट २०२० | संदर्भ: लोकमत
प्लास्टीक बंदी; कारवाईकडे पाठ, जनजागृतीसाठी निधी खर्च
पर्यावरण विभागाने प्लास्टीक व थर्माकॉलच्या मुद्यावर जनजागृती करण्याचा सोयीस्कर पर्याय निवडला असून प्रदूषण नियंत्रण मंडळासाठी १० कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद करण्यात केली आहे.
२९ जुलै २०२० | संदर्भ: सकाळ
एक धक्कादायक अहवाल ! मुंबईकरांचे आयुष्य 3 वर्षांनी कमी होणार ? पुणेकरांनो तुमच्याबद्दल काय लिहिलंय माहितीये ?
मुंबई : हवेच्या वाढत्या प्रदुषणाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने काही निर्देश दिले आहेत. हे निर्देश पाळणे महत्वाचे आहे. अन्यथा मुंबई...
२५ जुलै २०२० | संदर्भ: सकाळ
पुणेकरांनो, हवेची गुणवत्ता काय हे जाणून घ्यायचंय? मग हे वाचा!
पुणे : देशातील चार प्रमुख महानगरांच्या हवेतील गुणवत्ता काढणाऱ्या 'सफर' या हवामान प्रणालीनुसार पुण्यातील हवेची गुणवत्ता चांगल्या श्रेणीची नोंदली गेली आहे. प्रदूषणातील घटक म्हणून ओळखले जाणारे अतिसूक्ष्म धूलिकणचे (पीएम 2.5) प्रमाण सफरच्या...
२१ जुलै २०२० | संदर्भ: सकाळ
शुद्ध आणि स्वच्छ हवेसाठी रेल्वे स्थानकावर सुरू होणार 'ऑक्सिजन पार्लर'! वाचा सविस्तर
मुंबई : कोरोना महामारीमुळे अमलात आलेल्या लॉकडाऊनचा अनेकांना फटका बसला, पण त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत झाली. आता रेल्वे स्थानकावर मुंबईकरांना स्वच्छ हवा मिळण्यासाठी मध्य रेल्वे प्रयत्नशील आहे. त्यासाठी रेल्वे स्थानकात ऑक्सिजन पार्लर...
०३ जुलै २०२० | संदर्भ: सकाळ
पुणेकरांनो, प्रदूषित हवाच तुमचा जीव घेऊ शकते!
पुणे : अशक्त प्रकृतीची व्यक्ती ट्रॅफीकमध्ये केवळ एक तासभर असताना जेवढी प्रदूषित हवा श्वासावाटे शरीरात घेते, ती हृदयविकार, मधुमेह किंवा अधिक कोलेस्ट्रॉल यामुळे असणाऱ्या जोखमीपेक्षा अधिक असते. हवा प्रदूषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या धोक्यांबाबत...
०२ जुलै २०२० | संदर्भ: सकाळ
महाराष्ट्रातील या शहराची लंडन, टोकियोपेक्षा हवा आहे शुद्ध
मुंबई - लॉकडाउन सुरू झाल्यापासून मुंबई शहरातील वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मुंबईने मंगळवारी पाच वर्षांतील सर्वांत शुद्ध हवा अनुभवल्याचा दावा ‘सफर’ने केला आहे. हवेच्या गुणवत्तेत मुंबईने लंडन, सिंगापूर, टोकियो, सिडनी या शहरांनाही मागे...
^ एप्रिल - जून, २०२०
१७ जून २०२० | संदर्भ: सकाळ
चला शुद्ध हवा मिळवूया....!
कोल्हापूर : हवेमध्ये कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढल्यास हवेचे प्रदूषण होते. याचा परिणाम केवळ हवेवरच होते असे नाही तर त्यामुळे तापमानवाढ ही होते. जागतिक तापमानवाढीचे हे प्रमुख कारण आहे. लॉकडाउनच्या काळात वाहने बंद असल्याने...
०९ जून २०२० | संदर्भ: सकाळ
अनलाॅकमध्ये वाहन वर्दळीच्या प्रदूषणाची होतेय तपासणी
सोलापूरः मागील दोन महिन्यांच्या लॉकडाउनच्या काळात शहरात थांबलेल्या वाहनांच्या वर्दळीने वायू प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. त्यानंतर आता अनलॉकमध्ये वाहनांची वर्दळ वाढली आहे. या बदलत्या स्थितीत प्रदूषण पातळीत झालेले बदल...
०७ जून २०२० | संदर्भ: सकाळ
लॉकडाउनमध्ये पुण्याला झाला मोठा फायदा; काय ते पहा
पुणे - लॉकडाउनच्या काळात शहरातील प्रदूषणात निम्म्याने घट झाल्याचे ‘अर्बन एमिशन’च्या अहवालातून सिद्ध झाले आहे. लॉकडाउन १ ते ४ दरम्यान राज्यासह देशभरातील प्रमुख शहरांतील हवेतील प्रदूषण पातळीची नोंद घेण्यात आली आहे. राज्यातील पुणे, मुंबई,...
०५ जून २०२० | संदर्भ: लोकमत
पर्यावरणीय बदल ठरताय जीवघेणे
नंदुरबार : बेसुमार जंगलतोड, सिमेंटचे उभे राहिलेले जंगल, वाढलेली लोकसंख्या, वाहनांची संख्या त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. जंगलातील पशु, पक्ष्यांचा अधिवास हिरावला गेल्याने त्यांची संख्या कमी झाली आहे. सातपुडा पुन्हा हिरवा करण्याचे मिशन गेल्या १० ते १५ वर्षात राबविले गेले असले तरी त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही.
०५ जून २०२० | संदर्भ: सकाळ
पुणेकरांना आता मिळतेय शुद्ध हवा; पाहा किती प्रमाणात घटले प्रदुषण
पुणे : लॉकडाउनच्या काळात शहरातील प्रदूषणात निम्म्याने घट झाल्याचे "अर्बन एमिशन'च्या अहवालातून सिद्ध झाले आहे. राज्यासह देशभरातील प्रमुख शहरांतील लॉकडाउन 1 ते 4 दरम्यान हवेतील प्रदुषक घटकांची पातळीची नोंद घेण्यात आली आहे. राज्यातील पुणे,...
०४ जून २०२० | संदर्भ: सकाळ
प्रदूषण घटले असले तरी `याचा` धोका मात्र कायम...
पुणे : देशातील पर्यावरण संवर्धनासाठी आजवर अनेक आंदोलने, चर्चासत्रे आणि परिषदा झाल्या. जनजागृतीसाठी असलेला हा आरडाओरडा खूप झाला, आता प्रत्यक्ष धोरणात्मक प्रकल्पांची अंमलबजावणी हवी, असा आग्रह पर्यावरण तज्ज्ञांकडून धरण्यात आला...
२१ मे २०२० | संदर्भ: लोकमत
'या' कारणाने हिरवा होत आहे अंटार्क्टिकातील पांढराशुभ्र बर्फ, वैज्ञानिकही झाले हैराण....
अंटार्क्टिकामधील बर्फ वितळतोय हे तुम्हाला माहीत असेलच. पण आता येथीत पांढऱ्या शुभ्र बर्फाचा रंग बदलतो आहे. येथील बर्फाचा रंग अचानक हिरवा होऊ लागला आहे. हा अजब नैसर्गिक बदल बघून वैज्ञानिकही हैराण झाले आहेत. कारण हे कशामुळे होत आहे याची त्यांनाही कल्पना नाही. आता याचा शोध घेतला जात आहे. मात्र, काही वैज्ञानिक याला पेंग्विनला जबाबदार धरतात.
१९ मे २०२० | संदर्भ: सकाळ
डोंबिवलीत प्रदूषणकारी कंपन्यांना परवानगी नकोच!
डोंबिवली : गेल्या मार्च महिन्यात डोंबिवली एमआयडीसीमधील प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या रासायनिक आणि धोकादायक अशा एकूण 21 कंपन्यांना प्रदूषण मंडळाने बंदच्या नोटीसा दिल्या होत्या. या भूमिकेचे डोंबिवलीकरांनी स्वागत केले होते. अनेक...
०९ मे २०२० | संदर्भ: सकाळ
जळगावची हवा झाली "शुद्ध' ...प्रदूषण स्तर 50 टक्क्यांनी घटला !
जळगाव : एरवी कुणालाही शक्य झाले नाही ते "कोरोना' संसर्गाने शक्य करून दाखविले. दीड महिन्यांपूर्वी अमृत योजनेतील कामे व त्यामुळे रस्त्यांच्या दुरवस्थेने शहर "धूळगाव' होऊन बसले होते.. ते "लॉकडाउन'मुळे पुन्हा जळगावच्या वाटेवर आले. धूळ...
०७ मे २०२० | संदर्भ: लोकमत
४६ टक्के विद्यार्थ्यांची वातावरण बदलावर भविष्यात संशोधनाचीही तयारी
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग लॉकडाऊन होऊन घरात बसले आहे.मात्र या काळात लोकांची पर्यावरणाविषयीची जागरूकता अधिक वाढली आहे. विशेष विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. या सर्वेक्षणातून आवश्यकता नसताना विजेची उपकरणे बंद करणे, पाण्याची बचत, स्वतःच्या घरातील...
१४ एप्रिल २०२० | संदर्भ: लोकमत
कोल्हापूर :शहरातील हवा प्रदूषण घटले
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील ‘जनता कर्फ्यू’नंतर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमध्ये कोल्हापूर शहरातील हवा प्रदूषणाचे मापन शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागाने केले. त्यामध्ये हवेतील सल्फर डायआॅक्साईड (एसओटू), नायट्रोजन डायआॅक्साईड (एनओटू), सूक्ष्म धूलीकणांचे प्रमाण (आरएसपीएम) कमी झाल्याचे दिसून आले.
१० एप्रिल २०२० | संदर्भ: सकाळ
जिल्ह्याच्या प्रदूषणात ७० टक्क्यांनी घट
भुसावळ : देशभरात कोरोनाचे संकट अधिकच गडद होत असताना, धास्तावलेल्या जिल्हावासियांसाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील प्रदूषणात पहिल्यांदाच थोडीफार नव्हे तर ७० टक्क्यांपर्यंत घट आली आहे, तर ऑक्सिजनचे प्रमाण वाढले...
०२ एप्रिल २०२० | संदर्भ: लोकमत
ठाण्यातील हवेतील प्रदुषण ४० टक्यांनी घटले
ठाणे : कोरोनाच्या पाशर््ववभूमीवर देशात संचारबंदी असल्याने वाहनांची वर्दळ पूर्णपणे थांबली आहे. याचा चांगला परिणाम वातावरणात दिसून आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शहरात इतर सर्व प्रकारची रहदारी जवळपास थांबली आहेत, तसेच इतर प्रदुषण करणारी कामही थांबली आहेत. त्यामुळेच ठाणे शहरातील मागील काही दिवसांत हवेतील प्रदूषणात तब्बल ४० टक्क्यांनी...
^ जानेवारी - मार्च, २०२०
२५ मार्च २०२० | संदर्भ: सकाळ
संचारबंदीचा असाही परिणाम... नागपूरच्या प्रदुषणात झाले हे बदल
नागपूर : कोरोनामुळे उपराजधानीत चार दिवसांपासून अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद आहे. त्याचा सकारात्मक परिणाम नागपूर शहरातील प्रदूषणाच्या पातळीवर झाला आहे. शहरातील प्रदूषणाची पातळी गेल्या चार दिवसांत निम्म्याने खाली आले आहे...
१८ मार्च २०२० | संदर्भ: लोकमत
'हे' आहे लठ्ठपणाचं एक मोठं कारण, ज्याकडे सगळेच करतात दुर्लक्ष!
मुळात आपल्याला बालपणी वायु प्रदूषणाबाबत फार लोकांना माहीत नसतं. पण आजकाल लहान मुलांनाही हे माहीत असतं की, वायु प्रदूषणामुळे श्वास घेण्याचा आणि डोळ्यांसंबंधी समस्या होऊ शकते. वायु प्रदूषणामुळे अस्थमा, हृदयरोग हे होत असल्याचं जवळपास सर्वांनाच माहीत आहे. पण अनेकांना हे माहीत नसतं की, वायु प्रदूषण हे लठ्ठपणाचं देखील कारण ठरतं. चला जाणून घेऊ वायु...
१७ मार्च २०२० | संदर्भ: लोकमत
Coronavirus : वातावरणबदल ठाणेकरांसाठी ठरु शकतो फायदेशीर
ठाणे : कोरोना व्हायरस रोखण्यासाठी हवामानातील बदलही महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे मागील काही दिवस उष्णतेची लाट सहन करणाऱ्या ठाणेकरांसह जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. उष्ण कटिबंधातील देशात हा व्हायरस जास्त फैलावू...
१४ मार्च २०२० | संदर्भ: लोकमत
नाशिकची ‘हवा’ कोणी बिघडवली?
नाशिक- दीड दोन वर्षांपूर्वी केंद्र शासनाने महाराष्टÑातील सतरा प्रदुषणकारी शहरांची यादी घोषीत केली आणि त्यात नाशिकचा समावेश केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. महापालिकेने शासकिय आदेशानुसार हवा प्रदुषण कमी करण्यासाठी समिती गठीत केली आणि कृती आराखडा तयार केला आहे. तथापि, प्रदुषण मंडळाला देखील नाशिकची हवा इतकी प्रदुषीत आहे यावर विश्वास बसत...
१३ मार्च २०२० | संदर्भ: लोकमत
स्वच्छ हवेसाठी मुंबईला ४८८ कोटी; वायुप्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा पुढाकार
मुंबई : वाहनांची वाढती संख्या, सुरू असलेली बांधकामे, खोदकामे, रस्त्यांची कामे, धूर ओकणारे कारखाने यासह अनेक घटकांमुळे मुंबईचे ‘गॅस चेंबर’ झाले आहे. असा एकही दिवस नाही की मुंबईची हवा स्वच्छ नोंदविण्यात येते. परिणामी, मुंबईतील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी आता केंद्र सरकार सरसावले आहे. त्यानुसार, गृह आणि शहर मंत्रालयाच्या निधीअंतर्गत २०२०-२१ सालासाठी ४ हजार ४०० कोटींपैकी मुंबईच्या वाट्याला ४८८ कोटी रुपये आले आहेत
०६ मार्च २०२० | संदर्भ: लोकमत
हवामान बदलामुळे ७० टक्के पक्ष्यांची पाठ
माणगाव : महाराष्ट्रात सर्वत्रच येणाऱ्या परदेशी पक्ष्यांच्या स्थलांतरामध्ये बदल झाल्याचे चित्र दिसून आले आहे, ही परिस्थिती वातावरणातील तीव्र बदलामुळे झाली असल्याचे बोलले जात आहे. कमीत कमी २० डिग्री ते जास्तीत जास्त ३८-४० डिग्री असे एकाच दिवसात तापमान जवळ-जवळ २० डिग्रीने कमी-जास्त होत असल्याची, तसेच ० टक्के आर्द्रता फेब्रुवारी महिन्यातच....
०४ मार्च २०२० | संदर्भ: लोकमत
वायुप्रदूषणामुळे जगात आयुर्मान ३ वर्षांनी होतेय कमी
बर्लिन : वायू प्रदूषणामुळे जगातील लोकांचे आयुर्मान जवळपास ३ वर्षांनी कमी होत आहे. जर्मनीतील ‘मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर केमिस्ट्री’च्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. या संशोधनातून ही बाब समोर आली आहे की, युद्ध किंवा अन्य प्रकारचा हिंसाचार आणि मलेरिया, एड्स व धूम्रपानामुळे होणाऱ्या रोगांपेक्षा प्रदूषणामुळे आयुष्य
०३ मार्च २०२० | संदर्भ: सकाळ
प्रदूषणामुळे माणूसच नव्हे तर, पशू-पक्षीही घायकुतीला..!
मुंबई : प्रदूषणाचा फटका फक्त माणसांनाच नाही, तर पक्ष्यांनाही बसू लागला आहे. घार आणि घुबडासारखे मोठे पक्षी प्रदूषणाला बळी पडत आहेत. परळ येथील पशू-पक्षी रुग्णालयात वर्षभरात उपचारासाठी येणाऱ्या घारींपैकी २५ ते ३० टक्के घारी प्रदूषणामुळे...
०१ मार्च २०२० | संदर्भ: लोकमत
नाशिककरांना बसतोय वातावरण बदलाचा फटका
नाशिक : शहर व परिसरात मागील चार दिवसांपासून वातावरण बदलाचा क मालीचा अनुभव नाशिककरांना येत आहे. कमाल-किमान तापमानात निम्म्याचा फरक असून नाशिककरांना दिवसा उन्हाचा चटका अन् संध्याकाळनंतर गारव्याची तीव्रता अनुभवयास येत आहे. अचानकपणे झालेल्या या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.
०१ मार्च २०२० | संदर्भ: लोकमत
भल्या भल्यांना जे जमले नाही ते कोरोनाने केले; नासाकडून फोटो प्रसिद्ध
शांघाय : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. उद्योगधंदे, विमान वाहतूक, माल वाहतूक, पर्यटन अशा क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. यामुळे मोठमोठ्या उद्योगांचे आणि जगातील 500 श्रीमंत व्यक्तींचे 444 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. असे असताना कोरोनानेचीनसाठी मोठ्या समस्येसोबत लढण्यासाठी मदत केली आहे.
२८ फेब्रुवारी २०२० | संदर्भ: सकाळ
ठाण्यात तापमानवाढीबरोबर हवाही प्रदूषित
ठाणे : ठाणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळी हवेत गारवा जाणवत असला, तरी दिवसा शहरातील तापमानवाढीला सुरुवात झाल्याची प्रचीती येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाच्या तीव्र झळा ठाणेकरांना सोसाव्या लागत आहेत. तापमानवाढीमुळे...
२५ फेब्रुवारी २०२० | संदर्भ: सकाळ
इंधन, प्रदूषण वाचविण्यासाठी स्वयंचलित गतिरोधक
सोलापूर : जिल्ह्यात व शहरात अनेक शाळा व महाविद्यालये रस्त्याच्या बाजूला आहेत. त्यामुळे शाळेसमोरून जाताना वाहनांचा वेग कमी व्हावा म्हणून गतिरोधक बसविण्यात आले आहेत. मात्र, शाळांना सुटी असताना गतिरोधकाचा उपयोग होत नाही. यासाठी...
१८ फेब्रुवारी २०२० | संदर्भ: लोकमत
अकोल्यात वातावरण बदलावर मंथन!
अकोला : वातावरण अनुरू प दिशादर्शक तंत्रज्ञान विकासावर दोन दिवसीय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. १७ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या परिषदेला देशातील शास्त्रज्ञ उपस्थित झाले आहेत...
१५ फेब्रुवारी २०२० | संदर्भ: लोकमत
हवामानबदलांएवढे संकट सुपरबग्जमुळे
गेल्या २६ वर्षांत मानवांचा निसर्गातील हस्तक्षेप प्रचंड वाढला. म्हणून पर्यावरणीय विनाश याआधी कधीही नव्हता इतक्या मोठ्या प्रमाणावर जगभर घडत आहे. या ग्रहावरील जीवन कायमचे संपुष्टात येण्याचा धोका मानवजात व सर्व प्रजातींपुढे उभा राहिला आहे. सुमारे एक हजार वैज्ञानिकांनी १९५०नंतरच्या कालखंडास अँथ्रोपोसिन असे भूशास्त्रीय नाव दिले आहे
१४ फेब्रुवारी २०२० | संदर्भ: सकाळ
बीएस-6 प्रणालीची वाहने लवकर रस्त्यांवर धावणार : पर्यावरणमंत्री
पुणे : देशातील वाहनांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी येत्या 1 एप्रिलपासून बीएस-6 या प्रणालीची वाहने बाजारपेठेत आणण्यात येणार असल्याचे केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी (ता.14) सांगितले. यासाठी केंद्र सरकारने 60 हजार कोटी...
०७ फेब्रुवारी २०२० | संदर्भ: लोकमत
डोंबिवलीतील वायुप्रदूषण; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस
डोंबिवली : एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणामुळे काही दिवसांपासून त्रस्त असलेल्या पूर्वेतील खंबाळपाड्यातील भोईरवाडी भागातील काही नागरिकांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबईतील संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पोस्टाद्वारे बुधवारी अधिकाऱ्यांना ही नोटीस मिळाली असून, अधिकारी त्याला काय उत्तर देतात,...
०७ फेब्रुवारी २०२० | संदर्भ: सकाळ
कमी पेट्रोलवर चालणारी प्रदूषणमुक्त बाईक
जळगाव : प्रचंड वाढलेल्या वाहनांच्या संख्येने प्रदूषणाने रौद्ररूप धारण केले आहे. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी अलीकडच्या काळात ई-बाईक्सची क्रेझ प्रस्थापित होत असून, त्यातून आदर्श घेत आर.आर. विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्यांनी बाईकवर अनोखा...
०४ फेब्रुवारी २०२० | संदर्भ: लोकमत
वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारांत वाढ
हवेतील गारवा, आर्द्रता आणि मध्येच जाणवणारी उष्णता यामुळे संसर्गजन्य आजारांचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. गत तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी पिकांनाही बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वातावरणाच्या बदलामुळे साथीचे आजार बळावले असून, जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालये सध्या फुल्ल असल्याचे चित्र आहे.
०३ फेब्रुवारी २०२० | संदर्भ: सकाळ
प्लॅस्टिकचा भस्मासुर!... 'इथं' घेतोय अक्राळविक्राळ रूप!
नाशिक : (मालेगाव) आशिया खंडातील टाकाऊ प्लॅस्टिकवर प्रक्रिया करणारे सर्वांत मोठे हब आहे. शहरात रोज सुमारे 800 टन, तर दरमहा सुमारे 24 हजार टन प्लॅस्टिक प्रक्रियेसाठी येते. शिवाय नागरिक वापरणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या, उत्पादने व कचरा वेगळाच...
०२ फेब्रुवारी २०२० | संदर्भ: लोकमत
हवामान बदलाची शेतकऱ्यांना भीती
येवला तालुक्यात आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण नसल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या मशागतीला वेग आलेला असताना थंडीतदेखील चांगली वाढ झाल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा आदी पिके बहरली होती. मात्र, रविवारी (दि.२) अचानक वातावरण पुन्हा बदलले. सकाळपासूनच आकाशात ढगांनी गर्दी केल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आल्याचे दिसून आले...
२९ जानेवारी २०२० | संदर्भ: लोकमत
आणखी तीन शहरांमध्ये वाढले हवा प्रदूषण
अकोला : राज्यातील १८ शहरांमध्ये हवा प्रदूषित असल्याने त्या संस्थांनी उपाययोजनांच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्यानंतर आणखी तीन शहरांमध्ये हवा प्रदूषित असल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. त्या शहरांमध्ये डोंबिवली, ठाणे व पिंप्री चिंचवड या महापालिकांचा समावेश आहे.
२९ जानेवारी २०२० | संदर्भ: सकाळ
सोलापूर महापालिकेचा प्रदूषण नियंत्रणासाठी 'हा' ऍक्शन प्लॅन
सोलापूर : शहरातील हवा प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होऊन श्वसनाचे विकार वाढू लागले आहेत. नागरिकांच्या तक्रारीनुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला धारेवर धरले. त्यानुसार महापालिकेने आता हवा प्रदूषण नियंत्रणाचा कृती आराखडा...
२८ जानेवारी २०२० | संदर्भ: सकाळ
अगस्ती'चा प्रदूषणमुक्त इथेनॉल प्रकल्प
अकोले : अगस्ती साखर कारखान्याचा प्रदूषणमुक्त इथेनॉल प्रकल्प अवघ्या 11 महिन्यांत पूर्णत्वास गेला. लवकरच कारखान्यात इथेनॉलनिर्मिती सुरू होणार आहे. अगस्ती कारखान्याची 1991मध्ये स्थापना झाली व 5 डिसेंबर 1992 रोजी पहिल्या हंगामाची...
२६ जानेवारी २०२० | संदर्भ: लोकमत
क्लायमेट सिटीत ठाणे देशात दुसऱ्या क्रमांकावर; सकारात्मक वातावरण बदलासाठी प्रयत्न
ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या एनर्जी आणि ग्रीन बिल्डिंग, अर्बन प्लानिंग, ग्रीन कव्हर, बायोडायव्हर्सिटी, ट्रान्सपोर्ट आणि हवा गुणवत्ता तसेच पाण्याचे नियोजन आणि वेस्ट मॅनेजमेंटवर केलेले विविध प्रयोग या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून राबविलेल्या या योजनांमुळे ठाणे शहराने स्मार्ट सिटी क्लायमेटमध्ये
२६ जानेवारी २०२० | संदर्भ: सकाळ
बीकेसीतील हवा दिल्लीपेक्षा घातक
मुंबई : महाराष्ट्रातील पहिला नियोजित "बिझनेस डिस्ट्रिक्ट' अशी ओळख असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात हवेतील प्रदूषणाची पातळी शनिवारी दिल्लीपेक्षा घातक होती, तर नवी मुंबईतील हवा दिल्लीएवढीच प्रदूषित होती. या दोन्ही ठिकाणी हवा श्वास...
२४ जानेवारी २०२० | संदर्भ: लोकमत
ग्रीन पीसच्या अहवालानुसार सोलापुरातील हवा प्रदूषित
सोलापूर : भारतात सर्वाधिक प्रदूषित असणाºया शहरांच्या यादीमध्ये सोलापूर शहराचा समावेश झाला आहे. ग्रीन पीस इंडिया या पर्यावरणसंबंधी काम करणाºया संस्थेने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला आहे. सोलापुरात हवेच्या दोन गुणवत्ता...
२४ जानेवारी २०२० | संदर्भ: लोकमत
धूळमुक्त शहरासाठी समिती गठित
अकोला: प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड असलेल्या राज्यातील १८ शहरांमध्ये अकोल्याचाही समावेश असल्याचे ‘लोकमत’ने सातत्याने मांडले. पालकमंत्री बच्चू कडू यांनीही दखल घेतली. ही बाब पुन्हा २३ जानेवारीच्या अंकात उमटताच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर...
२३ जानेवारी २०२० | संदर्भ: लोकमत
वायुप्रदूषणामुळे मुंबईची पांढरी फुप्फुसे पडली काळी, वांद्रे येथे प्रयोगाअंती निष्कष
मुंबई - मुंबईची हवा किती प्रदूषित झाली आहे? मुंबईकरांना श्वास घेताना काय अडचणी येतात? मुंबईची खरेच दिल्ली झाली आहे का? केवळ बीकेसी नाही, तर माझगाव, वरळी, अंधेरीसारखे परिसरही प्रदूषणाने वेढले आहेत का? यामध्ये नवी मुंबईचीही भर पडत आहे का? मुंबईचे वातावरण किती प्रदूषित आहे? मुंब
२२ जानेवारी २०२० | संदर्भ: लोकमत
वातावरणातील बदलांमुळे लंग फायब्रॉसिस
मुंबई : परळ येथील खासगी रुग्णालयात ३८ वर्षीय हेमाली शहा आणि ६८ वर्षीय रिटा चोक्सी यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हेमाली शहा यांना कबुतरांशी आलेल्या नियमित संपर्कामुळे हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमॉन्टिस हा दीर्घकालीन स्वरूपाचा फुप्फुसांचा आजार झाला होता, तर रिटा चोक्सी यांच्या दोन्ही फुप्फुसांचे प्रत्यारोपण करण्यात आले.
२२ जानेवारी २०२० | संदर्भ: लोकमत
वायू प्रदूषणामुळे मुंबईची पांढरी फुप्फुसे काळी पडली
मुंबई : मुंबईची हवा किती प्रदूषित झाली आहे. मुंबईकरांना श्वास घेताना काय अडचणी येतात. मुंबईची खरेच दिल्ली झाली आहे का. केवळ बीकेसी नाही तर माझगाव, वरळी, अंधेरीसारखे परिसरही प्रदूषणाने वेढले आहेत का; यामध्ये नवी मुंबईचीही भर पडत आहे का? आणि मुंबईचे वातावरण किती प्रदूषित आहे
२१ जानेवारी २०२० | संदर्भ: सकाळ
धक्कादायक, या कारणांनी खालावत आहे सर्वांच्याच शुक्राणूंची गुणवत्ता!
औरंगाबाद - वायुप्रदूषणाचे आरोग्यासंबंधीचे धोके सर्वश्रुत आहेत. त्यामुळे प्रजनन समस्याही निर्माण होतात. प्रदूषित हवेमध्ये प्राणवायू (ऑक्सिजन) कमी असतो. त्यामुळे शुक्राणूंचे नुकसान होऊ शकते. शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम होत नसला तरी तुम्ही जर...
१९ जानेवारी २०२० | संदर्भ: लोकमत
वातावरणातील प्रदूषण शोषून शुद्ध हवा सोडणारे उपकरण
नागपूर - हवेमधील धूलिकण, रासायनिक गॅस इतर घटकांमधून होणारे प्रदूषण शोषून शुद्ध हवा बाहेर सोडणारे एक उपकरण राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)ने तयार केले आहे. पॅसिव्ह एअर रिज्युव्हेनेटिंग सिस्टीम (पार्स) असे या उपकरणाचे नाव असून, परिसरातील ८० टक्के हवा शुद्ध करण्याची त्याची क्षमता असल्याचा दावा नीरीच्या संशोधकांनी केला आहे.
१९ जानेवारी २०२० | संदर्भ: लोकमत
हवामान बदलामुळे ऋतूंचे महिने बदलण्याचे संकेत
नवी दिल्ली : गेल्या काही वर्र्षातील हवामानाच्या नोंदी लक्षात घेता हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूंचे महिने अधिकृतपणे बदलले जाण्याची चिन्हे आहेत. तसे संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीत दिले. मान्सूनच्या आगमन व परतीबाबत हवामान विभाग अभ्यास करत असून त्याबाबत एप्रिलमध्ये घोषणा...
०६ जानेवारी २०२० | संदर्भ: सकाळ
मुंबईच्या हवेत नऊ सिगारेट इतका धूर!
मुंबई, ता. ५ : मुंबईत सिगरेट न ओढणाऱ्या व्यक्तीने श्वास घेतल्यास दिवसभरात शरीरात नऊ सिगारेटइतका धूर जमा होत आहे; तर नवी मुंबईत हे प्रमाण आठ सिगारेट एवढे आहे. तसेच वांद्रे-कुर्ला संकुल आणि मालाडमध्ये आज १२ सिगारेटच्या धुराएवढे प्रदूषण होते...
०४ जानेवारी २०२० | संदर्भ: लोकमत
वातावरणातील बदलाचा नवजात शिशूंच्या आरोग्याला फटका!
अकोला : ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. गार वाऱ्यामुळे थंडीतही वाढ झाल्याने त्याचा फटका नवजात शिशूंच्या आरोग्याला बसत आहे. अशा परिस्थितीत पालकांनी नवजात शिशूंची योग्य काळजी घेण्याचा सल्ला...
०४ जानेवारी २०२० | संदर्भ: महाराष्ट्र टाइम्स
वातावरणातील बदल आणि आरोग्य
वातावरणात झालेल्या या बदलांमुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता जास्त असते. ताप, सर्दी, खोकला असे अनेक साथीचे आजार बळावतात. अंगदुखी, उत्साह नसल्यासारखे वाटणे, डोके दुखणे असे अनेक आजार उद्भवतात. अचानक वाढलेला उष्मा आणि थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे. या आजारांवर वेळीच उपाय केले नाहीत, तर ते बळवण्याची शक्यता असते.
०१ जानेवारी २०२० | संदर्भ: सकाळ
मुंबईकरांनो दुषित हवेपासून स्वतःची घ्या काळजी! वाचा संपुर्ण बातमी
मुंबई ः मुंबईत हवामान अत्यंत खराब असलेले दिवस दोन वर्षांच्या तुलनेत २०१९ मध्ये वाढले. त्याचबरोबर हवा चांगली असल्याचे दिवसही वाढले, असे ‘सफर’ने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. महत्वाचं - मुंबईचे मरिना शहर होणार वाचा काय आहे...
^ ऑक्टोबर - डिसेंबर, २०१९
२८ डिसेंबर २०१९ | संदर्भ: लोकमत
दृष्टिकोन - हवामान बदलाबाबत ‘कॉप-२५’ परिषदेची फलनिष्पत्ती शून्यच
स्पेनची राजधानी मॅड्रिडमध्ये नुकतीच संपन्न झालेली कॉप-२५ (कॉन्फरन्स आॅफ पार्टीज) या नावाने ओळखली जाणारी हवामान बदलाविषयी उपाययोजना सुचविणारी आणि जमल्यास सर्वांना यासाठी भाग पाडणारी परिषद कोणत्याही साध्याशिवाय नुकतीच संपन्न झाली. गेल्या पंचवीस वर्षांच्या परिषदेच्या इतिहासात बऱ्यापैकी न करू शकलेली
२५ डिसेंबर २०१९ | संदर्भ: लोकमत
हवामान बदलासाठी १० जिल्हे अतिसंवेदनशील
अकोला : जागतिक वातावरणीय बदलामुळे राज्याचे सरासरी तापमान वाढणार असून, त्याचा प्रथम फटका बसण्याची शक्यता असलेल्या राज्यातील दहा जिल्हे अतिसंवेदनशील घोषित करण्यात आले आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये बदलासाठी अनुकूल ठरणाऱ्या उपाययोजना राबविण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे; मात्र सर्वच पातळीवर सामसूम असल्याचे चित्र सध्यातरी आहे.
२२ डिसेंबर २०१९ | संदर्भ: लोकमत
वायू प्रदूषण तपासणीची आणखी दोन केंद्रे
राज्यातील प्रदूषणात वाढ होणाऱ्या १७ शहरांमध्ये नाशिक महापालिकेची निवड करण्यात आल्यानंतर शहरात आणखी दोन ठिकाणी वायू प्रदूषणासाठी मापन केंद्रे सुरू येणार आहे. विशेष म्हणजे सध्या फक्त प्रदूषण नियंत्रण मंडळच उपकरणांच्या स्थितीबाबत मॉनेटरिंग करते, परंतु आता महापालिका आणि वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय निगराणी करणार आहे.
२१ डिसेंबर २०१९ | संदर्भ: लोकमत
हवामान बदलाचा परिणाम शेती, अर्थकारणावर!
अकोला: हवामान बदलाचा परिणाम शेती, शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होताना दिसत असून, बदलत्या हवामानाची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविसाठी स्वतंत्र संशोधन कें द्र, आचार्य (पीएचडी)पदवी अभ्याक्रम सुरू करावा, यासाठीचे प्रयत्न डॉ. पंजाबराव देशमुख कृषी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सुरू केले आहेत
१३ डिसेंबर २०१९ | संदर्भ: लोकमत
सोलापूर महापालिका सर्तक; धूळ कमी करण्यासाठी सोलापुरातील हालचाली वाढल्या
सोलापूर : आपल्या शहरामध्ये धुळीचे प्रमाण जास्त आहे. यामुळे भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरात सोलापूरचा क्रमांक हा १६ वा आहे. धुळीच्या समस्येमुळे नागरिकांना विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. यावर आळा ...
१२ डिसेंबर २०१९ | संदर्भ: लोकमत
राज्यातील १७ शहरांच्या हवेचा दर्जा सुधारणार!
सांगली : हवेचा दर्जा सुधारण्यासाठी सांगलीसह राज्यातील सतरा शहरांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाऊल उचलले आहे. त्यासाठी कृती आराखडा निश्चित केला आहे. तोे शासनाला सादर झाला आला असून, जानेवारीपासून अंमलबजावणीची अपेक्षा आहे.
२२ नोव्हेंबर २०१९ | संदर्भ: लोकमत
दिल्लीत आजही प्रदूषणाने केला कहर, एअर क्वालिटी इंडेक्स 350च्या पार
नवी दिल्ली - दिल्लीतीलप्रदूषणात वाढ होत असून हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. दिल्लीत आजही प्रदूषणाने कहर केला असून एअर क्वालिटी इंडेक्स 350च्या पार आहे. प्रदूषणात वाढ झाल्याने श्वास घेणं ही लोकांसाठी कठीण झालं आहे. वायू गुणवत्ता खराब श्रेणींमध्ये आली असून येत्या काही दिवसांत ती आणखी
२२ नोव्हेंबर २०१९ | संदर्भ: लोकमत
हवामान बदलामुळे परदेशी पक्ष्यांचे आगमन लांबणीवर
वरकुटे-मलवडी : तब्बल अकरा वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर माण तालुक्याच्या सरहद्दीवरील देवापूर परिसरातील असणारा ब्रिटिशकालीन तलाव काठोकाठ भरला आहे. महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पाणी भरावावरून वाहत असल्याने धबधब्याचे स्वरूप आले आहे.
२० नोव्हेंबर २०१९ | संदर्भ: लोकमत
धूळ, हवेतील कार्बन कण ठरताहेत श्वसनसंस्थेसाठी कर्दनकाळ
अकोला : वाढते औद्योगिकीकरण, वाहनांची वाढलेली प्रचंड संख्या व रस्ते, इमारतींच्या बांधकामांमुळे वातावरणात मिसळणारी धूळ यामुळे हवेची गुणवत्ता खराब झाली असून, हवेतील घातक कण श्वसनसंस्थेसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. जगभरात मानवाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाºया रोगांमध्ये श्वसनविकार तिसºया क्रमांकावर असल्याची माहिती प्रसिद्ध फुप्फुस...
२० नोव्हेंबर २०१९ | संदर्भ: लोकमत
वातावरणातील प्रदूषण ठरते ‘सीओपीडी’ला कारणीभूत
मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, सीओपीडी हा आजार गंभीर असून, यामध्ये हृदयरोग प्रथम क्रमांकावर आहे, परंतु सीओपीडीचे वाढते प्रमाण लक्षात घेता २०३० पर्यंत सीओपीडीमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. वातावरणातील प्रदूषण, तसेच धूम्रपान यामुळे सीओपीडीसारख्या आजाराचे प्रमाण मोठ्या...
२० नोव्हेंबर २०१९ | संदर्भ: लोकमत
नवी मुंबई, बीकेसी, माझगावची हवा दूषित
मुंबई : एकीकडे मुंबईकरांना थंडीचे वेध लागले असतानाच दुसरीकडे मात्र मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावत आहे. हवेची गुणवत्ता नोंदविणाऱ्या ‘सफर’ या संकेतस्थळावर मंगळवारी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) मधील हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण अधिक नोंदविण्यात आले आहे. त्याखालोखाल नवी मुंबई आणि
१८ नोव्हेंबर २०१९ | संदर्भ: लोकमत
अतिनील किरणांच्या उपयोगाने बॅक्टेरियल संसर्ग टाळता येतो : बिल पाल्मर
नागपूर : अल्ट्राव्हॉयलेट किरणे ही तशी मानवी आरोग्यासाठी धोकादायक असतात. ओझोनच्या स्तरामुळे त्या अतिनील किरणांपैकी ‘युव्ही-सी’चा (अल्ट्राव्हॉयलेट-सी अतिनील किरण) योग्य वापर केला तर बॅक्टेरियांची वाढ खुंटवून त्यामुळे संसर्ग...
१७ नोव्हेंबर २०१९ | संदर्भ: लोकमत
प्रदूषणाचा विळखा! दिल्ली-NCR मध्ये श्वास घेणंही झालं धोकादायक
नवी दिल्ली - दिल्लीतीलप्रदूषणात वाढ होत असून हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. प्रदूषणात वाढ झाल्याने श्वास घेणं ही लोकांसाठी कठीण झालं आहे. वायू गुणवत्ता खराब श्रेणींमध्ये आली असून येत्या काही दिवसांत ती आणखी खालावण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे
०७ नोव्हेंबर २०१९ | संदर्भ: लोकमत
मोदींच्या वाराणसीत प्रदूषण वाढलं; देवालाही मास्क लावलं
वाराणसी - दिल्लीतील प्रदूषणात वाढ झाल्याने हवेची गुणवत्ता ही खालावली आहे. दिवाळीत फटाके फोडल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली असून श्वास घेणं ही लोकांसाठी कठीण झालं आहे. असं असतानाच उत्तर भारताला वायू प्रदूषणाने विळखा घातला आहे.
०७ नोव्हेंबर २०१९ | संदर्भ: लोकमत
परालीपासून तयार होऊ शकतो सीएनजी - अरविंद केजरीवाल
दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या परालीपासून सीएनजी तयार होऊ शकतो अशी कल्पना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तज्ञांसोबत बैठक झाल्यावर मांडली आहे. हा प्रयोग तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या सहज शक्य
०७ नोव्हेंबर २०१९ | संदर्भ: लोकमत
पर्यावरणातील बदल ही संकटाची चाहूल?
पालघर : समुद्राच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने सातपाटीसह किनारपट्टीवरील अनेक घरात पाणी शिरले. त्याच बरोबरीने जिल्ह्यात एका पाठोपाठ एक भूकंपाचे धक्के बसत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता अचानक पर्यावरणात बदल होत समुद्राच्या पातळीत झालेली वाढ, चक्रीवादळाच्या घटना या भविष्यातील एखाद्या मोठ्या संकटाची चाहूल तर ...
०६ नोव्हेंबर २०१९ | संदर्भ: लोकमत
प्रदूषण करतंय तुम्हाला म्हातारं; कसं ते जाणून घ्या
दिल्लीत प्रदूषणाचा स्तर एवढा वाढला आहे की, भारताची राजधानी असलेल्या या शहरात 'हेल्थ एमरजेन्सी' घोषित करण्यात आली आहे. प्रदूषणाचा परिणाम आपल्या आरोग्यासोबतच आपल्या त्वचेवरही होत असतो. प्रदूषणात धूळ, माती यांच्या संपर्कात आल्याने त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्या सुरुवातीला पाहायला साध्या वाटत असल्या ...
०६ नोव्हेंबर २०१९ | संदर्भ: लोकमत
दिल्लीतील प्रदूषणामुळे पर्यटकांच्या संख्येत घट
नवी दिल्ली - परदेशातून अनेक पर्यटक हे शहरातील विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला येत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे परदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याची माहिती राज्य पर्यटन विभागाने दिली आहे. दिल्ली पर्यटन
०५ नोव्हेंबर २०१९ | संदर्भ: लोकमत
वाढणाऱ्या प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी ऋजुता दिवेकरांच्या खास टिप्स
दिल्लीत प्रदूषणाचा स्तर एवढा वाढला आहे की, भारताची राजधानी असलेल्या या शहरात 'हेल्थ एमरजेन्सी' घोषित करण्यात आली आहे. वायू प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी मास्क हाच एकमेव उपाय नाहीतर शरीराला वायूप्रदूषणापासून वाचवण्यासाठी इतर उपाय करणंही गरजेचं आहे. स्मॉग किंवा वायूप्रदूषणाचा स्तर विषारी वायूंमुळे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो.
^ जुलै - सप्टेंबर, २०१९
२९ सप्टेंबर २०१९ | संदर्भ: लोकमत
कारखान्यांचे वायू उत्सर्जन ठरतेय जीवघेणे!
मुंबई शहर व उपनगरासह मुंबई महानगर प्रदेशातील जीवघेणे प्रदूषण विशेषत: वायुप्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई महापालिकेच्या मदतीने तयार केलेला ‘मुंबईचा स्वच्छ हवा कृती आराखडा’ केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केला आहे.
२१ सप्टेंबर २०१९ | संदर्भ: लोकमत
हवामान बदलाच्या संकटावर राज्यात शाळकरी मुलांचा जागर
औरंगाबाद : स्वीडनमधील ग्रेटा थनबर्ग या मुलीच्या ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’च्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील अनेक शाळकरी मुलांनी शुक्रवारी रॅली काढून पर्यावरणाचा जागर केला. या वेळी मुलांना पर्यावरणाची शपथही देण्यात आली. या सात दिवसांच्या जागरात पहिल्याच दिवशी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि कोल्हापुरात अनेक शाळांनी सहभाग नोंदविला.
२४ ऑगस्ट २०१९ | संदर्भ: लोकमत
ओला-कोरडा दुष्काळ सर्वात मोठे आव्हान!
औरंगाबाद - थैमान घालणाऱ्या पावसाने यंदा देशभरात हजारापेक्षा जास्त बळी घेतले. हजारो लोकांना बेघर केले. कोट्यवधींचे नुकसान केले. ओल्या दुष्काळाचा हा कहर सुरू असतानाच महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भासारख्या भागात पाण्यासाठी टँकर मागवावे लागले.
२४ ऑगस्ट २०१९ | संदर्भ: लोकमत
धोकादायक हवामान बदलाचा सामना जमिनीद्वारे
जगात समृद्धी वाढायला लागल्यावर चैनीच्या बाबींवर जीवनशैली कायम ठेवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात खर्च होतो आणि तुलनेत खाण्यावर व अन्नावर खर्च कमी होत जातो. अधिकाधिक प्रमाणात असं घडायला लागल्यावर कारची विक्री कमी झाली की, अर्थव्यवस्था मंदीसाठी पूर्णपणे ‘तयार’ असल्याचं दिसतं. आपला अनुभव सध्या असाच आहे.
२६ जुलै २०१९ | संदर्भ: लोकमत
दोन लाख लोकांना वर्षाला पुरेल, इतक्या पाण्याची होतेय वाफ!
ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, यात आता नवीन काहीच नाही, पण यामुळे कोणकोणत्या बिकट संकटांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं याची अजूनही सर्वसामान्यांना पुरेशी कल्पना आलेली नाही.
Disclaimer:
वरील लेख हे त्यांच्या मूळ स्वरूपातील मीडिया / जर्नल्स / मासिके यामधून संकलित केले आहे. लेखातील व्यक्त केलेले मत हे आई.आई.टी.एम - एन्वीस चे मत दर्शवितातच असे नाही.